“रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही…”; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

बीड (प्रतिनिधी): “माझ्या कुटुंबाला मी डावावर लावलंय… मला रोज मारण्याच्या धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा घात करेल आणि संपवून टाकेल, याची मलाच कल्पना नाही. पण, मी समाजासाठी मैदानात उतरलोय, या मरण-बिरणाला मी भीक घालत नाही!” अशा अत्यंत रोखठोक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. करमाळा … Read more

आष्टी तालुक्यात पूरस्थिती गंभीर – गावोगाव पाणी शिरले, संपर्क तुटले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आष्टी (प्रतिनिधी):आष्टी तालुक्यात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काल रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांवर मोठे संकट कोसळले असून प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे. गावांना तळ्याचे स्वरूप, शेतं पाण्याखाली शनिवार आणि … Read more

परळी वैद्यनाथ मतदारसंघात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती; आमदार धनंजय मुंडे आवाहन

परळी वैद्यनाथ मतदारसंघातील नागरिकांसाठी सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्व लहान मोठ्या नद्यांना पूर आलेला आहे. या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून घरं, शेतजमीन, पशुपालन आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला दिसतो आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, प्रशासन … Read more

बीड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहावे

बीड: हवामान खात्याने बीड जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून नदी-नाल्यांचा पाणी स्तर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, पूरप्रवण भागांपासून दूर रहावे आणि अधिकृत सूचना काटेकोरपणे पाळाव्यात, अशी महत्त्वाची सूचना ज्येष्ठ नेते आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण … Read more

तलाव तुडुंब भरला, गावकऱ्यांच्या तत्परतेने टळले मोठे संकट

बीड:कृष्णा केदार – मौजे जोला आणि आसपासच्या परिसरात शुक्रवारी व शनिवार या दोन दिवसांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गावातील तलाव तुडुंब भरून वाहू लागला. तलावाच्या भिंतींवरून पाणी ओसंडून वाहत असल्याचे पाहून गावकऱ्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याची तयारी सुरू झाली. गावकऱ्यांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेतली आणि संकट टाळण्यासाठी एकत्र येऊन तातडीने उपाययोजना सुरु केल्या. … Read more

बीडमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शाळा आणि पोलीस ठाण्यातही पुराचे पाणी

बीड: गेल्या चार दिवस विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून रात्री ११ वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुराने बहुतांश खरिपाचे पिके नष्ट झाली होती. जमिनी खरडल्यामुळे गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे उरलेल्या पिकांना देखील फटका बसल्याचे दिसून आले. बीडमधील सहा तालुक्यांमध्ये २४ तासांत … Read more

बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच; १८ महसूल मंडलात अतिवृष्टी, नद्यांना पूर – अनेक गावांचा संपर्क तुटला

बीड : बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस शनिवारी सकाळपर्यंत कायम राहिला. दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. प्रशासनाने जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील बिंदुसरा, कुंडलिका, … Read more

महाराष्ट्रात ओला दुष्काळ? अजित पवारांचे थेट उत्तर

पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्यातील शेतकरी संघटना, स्थानिक नागरिक तसेच विरोधकांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि सांगितले की, “शासन योग्य ते निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत लवकर उपलब्ध … Read more

धानोरा शिवारात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

आष्टी (बीड): आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा शिवारात १५ सप्टेंबर २०२५ रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि सोबतच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिके, शेतमाल तसेच शेतात बसवलेली उपकरणे यांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. धानोरा शिवारातील शेतकरी नागेश अशोक होळकर यांच्या गट नं. १४२/२/अ … Read more