सिंदफणा नदीचे रौद्ररूप! शिरूर (का ) बाजारात विक्रमी महापूर, व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान

शिरूर कासार : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नद्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदीच्या पाण्याचा जोर एवढा होता की शिरूर कासार शहरातील बाजार तळ भागात पाणी शिरले. पाणी एवढ्या वेगाने आले की व्यापाऱ्यांना आपापले दुकानातील माल वाचवण्याची … Read more

गोट्या गीतेसह पाच जणांवरील मोका रद्द – रघु फड, धनराज गित्ते यांच्यावर कारवाई कायम

बीड : परळी शहरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सहदेव सातभाई यांच्यावर झालेल्या हल्ला व लूटमारीच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार रघु फड याच्यासह सात जणांवर मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act – MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता अपर पोलिस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार टोळीतील गोट्या गीते याच्यासह पाच जणांवरील … Read more

बीड क्राईम : ग्रामसेवक दोन हजाराची लाच घेताना पकडला – केज पंचायत समितीत कारवाई

केज (प्रतिनिधी) :केज तालुक्यात आज दुपारी भ्रष्टाचाराविरोधात मोठी धडक कारवाई झाली. केकतसारणी गावचे ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई थेट केज पंचायत समितीच्या आवारात पार पडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभार्थी असून, घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी लागणाऱ्या … Read more

बीड क्राईम : मूकबधिर शाळेच्या शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले

केज : केज तालुक्यातील सारणी गावात शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या घटनेने सगळ्यांच्या मनाला चटका लावला आहे. गावातील ४६ वर्षीय शिक्षक अशोक नारायण भंडारे यांनी स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं. ही बातमी पसरताच गावात शोककळा पसरली. अशोक भंडारे हे उमरी फाटा येथील मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत शिक्षक होते. शांत, … Read more

बीड रेल्वे स्थानकावर दुसऱ्याच दिवशी अव्यवस्था! प्रवाशांची नाराजी – स्वच्छता व सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

बीड: तब्बल चार दशके वाट पाहिल्यानंतर बीड जिल्ह्याचे स्वप्नवत रेल्वे स्वप्न १७ सप्टेंबर रोजी पूर्ण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बीड – अहमदनगर रेल्वे मार्गावरील पहिली रेल्वे गाडी धावली. बीडकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. परंतु उद्घाटनाचा आनंद दुसऱ्याच दिवशी धक्का बसला. स्थानक परिसरात कचरा, … Read more

बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका – कपाशी पिकांचं मोठं नुकसान

बीड : बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी पाण्याखाली रस्ते गेले आहेत. माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांवर या पावसाचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः कपाशी पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून उत्पादन घटण्याची … Read more

धानोरा शिवारात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

आष्टी (बीड): आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा शिवारात १५ सप्टेंबर २०२५ रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि सोबतच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिके, शेतमाल तसेच शेतात बसवलेली उपकरणे यांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. धानोरा शिवारातील शेतकरी नागेश अशोक होळकर यांच्या गट नं. १४२/२/अ … Read more

बीड-नगर रेल्वेचे उद्घाटन; पंकजा मुंडेंचा टोला – ‘पेरलं कुणी, मशागत कुणी केली, कापणीला बजरंग बाप्पा आले’

बीड : बीडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा आज भव्य सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणासाठी हजारो नागरिक, राजकीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या उद्घाटन कार्यक्रमात श्रेयवादावरून रंगलेले राजकारणही स्पष्ट दिसून आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध पक्षांचे बॅनर, फेस्टून, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे कोणाचे योगदान अधिक, कोणाला श्रेय द्यायचे यावरून राजकीय … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र वाटप; मराठा बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

बीड – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बीड जिल्ह्यात ऐतिहासिक असा कार्यक्रम पार पडला. बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मराठा समाजातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांची, मराठा बांधवांची आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाच्या भावनांना … Read more

Maharashtra Student Scholarship 2025 : शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत मोठा बदल, विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी सुधारणा! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यानुसार, विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान एकदा सादर केलेली उत्पन्न, वैयक्तिक माहिती व कागदपत्रे शिष्यवृत्ती अर्जासाठी निर्णायक मानली जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष किंवा अभ्यासक्रमासाठी ही माहिती पुन्हा सादर करण्याची गरज राहणार नाही, असे मंत्री … Read more