हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

बीडमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शाळा आणि पोलीस ठाण्यातही पुराचे पाणी

On: September 27, 2025 3:53 PM
Follow Us:

बीड: गेल्या चार दिवस विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून रात्री ११ वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुराने बहुतांश खरिपाचे पिके नष्ट झाली होती. जमिनी खरडल्यामुळे गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे उरलेल्या पिकांना देखील फटका बसल्याचे दिसून आले.

बीडमधील सहा तालुक्यांमध्ये २४ तासांत ५० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पाटोदा तालुक्यात ७० मिमी, धारूर ६३.८ मिमी, तर परळी ६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या १८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून पाटोदा तालुक्यातील थेरला महामंडळात ११४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. धारूर, तेलगाव, घाटनांदूर मंडळात ८४ मिमी इतका पाऊस नोंदला.

शुक्रवारी रात्रभर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. परळी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर सरस्वती नदीच्या पुलाचे काम रखडल्याने वाहतूक धोकादायक झाली. परळी तालुक्यातील अहमदपूर शाळेत चार फूट पाणी साचल्याने शालेय साहित्याचे नुकसान झाले, तर माजलगाव तालुक्यातील बडेवाडी शाळेतही पाणी साचले. बीड शहरातील सखल भागातील पाणी शहराला नदीचे स्वरूप दिले, तर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातही पाणी घुसले.

परळी तालुक्यातील भिलेगाव पुलावरून पाणी जात असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. केजमध्ये एक तर माजलगाव तालुक्यातील दोन गावांचा संपर्क तुटला होता. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना मदत पोहोचवली. माजलगाव धरणातून सिंदफणा नदीपात्रात विसर्ग केला जात असल्याने चिंचोली गावालाही पाण्याचा धोका निर्माण झाला आणि संपर्क तुटला.

माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडून सिंदफणा नदीपात्रात ११३,९२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. केजच्या धनेगाव येथील मांजरा धरणातून ३५,८८९ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला. प्रशासनाने सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी किंवा वाढवला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

ताज्या बातम्या

“रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही…”; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

“दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र…” विकासकामे रोखल्याच्या नैराश्यातून शिवसेना नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटली अन् अनर्थ टळला!

‘फरार कृष्णा आंधळे गावात येऊन गेला!’; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात थंडीची लाट येणार, बीड जिल्ह्याला यलो अलर्ट

बीडच्या राजकारणात मोठा धक्का: डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला

‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वर ओळख; छत्रपती संभाजीनगरला बोलावलं आणि… बीडच्या महिलेसोबत भयंकर घडलं

Leave a Comment