बीड : बीडकरांचे अनेक दशकांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. नगर-बीड रेल्वे मार्गावर आजपासून रेल्वे धावणार असून पहिल्यांदाच रेल्वे बीड शहरात प्रवेश करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये दिलेले वचन पूर्णत्वास नेले आहे.
हिरवा झेंडा बीड मध्ये, पहिली रेल्वे बीडमध्ये येणार
बीड येथून हिरवा झेंडा दाखवून रेल्वे प्रवासाची सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. बीडमध्ये नागरिक या पहिल्या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्टेशन परिसरात स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी, फुलांनी सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही तयारी सुरू आहे.आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि हा बीडकर साठी आनदाचा दिवस ठरला .
बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण
बीड हा राज्यातील रेल्वे नसलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आता मात्र बीडकरांना थेट नगर, पुणे, नाशिक, मुंबई तसेच इतर शहरांशी रेल्वेने संपर्क मिळणार आहे. हा मार्ग सुरू झाल्याने व्यापार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.
मोदींची घोषणा सत्यात
२०१९ मध्ये मोदी बीड दौऱ्यावर आले होते आणि “माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न मी पूर्ण करेन” असे सांगितले होते. आज ती घोषणा सत्यात उतरत असून सोशल मीडियावर या घोषणांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
बीडमध्ये जल्लोष
शहरातील नागरिक रेल्वेच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. स्थानकावर मोठ्या प्रमाणावर नागरिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांची गर्दी होणार आहे.
१७ सप्टेंबरला नियमित सेवा
आज उद्घाटन सोहळ्यानंतर १७ सप्टेंबरपासून नियमित रेल्वे सेवा सुरू होणार आहे. “आगला स्टेशन… बीड!” हा आवाज ऐकण्यासाठी नागरिक आतुर आहेत.








